माधवी रणजित देसाई (२१ जुलै, इ.स. १९३३; कोल्हापूर - १५ जुलै, इ.स. २०१३; बेळगाव) या मराठीतील एक लेखिका होत्या. त्या भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित नाच गं घुमा हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या १५ कादंबऱ्या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि काही व्यक्तिचित्रसंग्रह अशी सुमारे ३५ पुस्तके आहेत.
सत्तावीस वर्षांपूर्वी बेळगावजवळ कडोली येथे माधवी देसाई यांनी प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतरच सीमाभागात साहित्य संमेलने आणि मराठी भाषेची चळवळ वाढली. १९९०पासून त्यांचे वास्तव्य गोव्यात बांदिवडे येथे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑक्टोबर २०१२मध्ये, त्या आपल्या कन्या कवयित्री मीरा तारळेकर यांच्याकडे बेळगावात रहावयास आल्या.
वयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी साडेचारला त्यांचे बेळगाव येथे निधन झाले.
माधवी देसाई
या विषयातील रहस्ये उलगडा.