मराठी ख्रिश्चन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मराठी ख्रिश्चन किंवा मराठी ख्रिस्ती हा ख्रिश्चन धर्म आचरणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक समूह आहे. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन गटात आढळतात - पहिले ईस्ट इंडियन ख्रिश्चन, जे मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूलनिवासी आहेत; व दुसरे हिंदूधर्मातून धर्मांतरित झालेले, प्रामुख्याने अहमदनगर, सोलापूर, पुणे नाशिक आणि औरंगाबाद येथील, ,"मराठी ख्रिस्ती " म्हणून ओळखले जातात. २०११ च्या भारतीय जनगणनेच्य अहवालानुसार, महाराष्ट्रात ख्रिस्तींची लोकसंख्या ०.९६% (सुमारे १%) आहे

इंग्रजाच्या काळात १८व्या शतकात काही लोकांनी मिशनरिचा कार्याने प्रभावित होऊन धर्मांतर केले, त्यात मधल्या जातीच्या लोकाबरोबर काही ब्राह्मण कुटुंबांनीही धर्मपरिवर्तन केले. त्यात ना. वा. टिळक. पंडिता रमाबाई आणि रामकृष्ण मोडक होते. ह्या ब्राह्मणांचा ख्रिस्ती समाजावर खूपच प्रभाव पडला,ना वा टिळकांनी लीहलेली गीते आणि भजने चर्च मध्ये भक्तिगीते म्हणून आज ही गायले जातात.

ब्रिटिश मिशनरी विल्यम क्यारे ह्यांचं मराठी साहित्यातले योगदान नावाजले जाते, त्यांनी पाहिले मराठी बायबल १८२० मध्ये लिहले आणि त्यासाठी त्यांनी मराठी व्याकरण प्रमाणित केले, ब्रिटिश मिशनिरिनी इंग्रजी–मराठी शब्दकोशची निर्मिती केली आणि मराठी साहित्याला पश्चिमी साहित्याशी पहील्यादा परिचित केले.

हिंदू, इस्लाम, बौद्ध व जैन धर्मांनंतर ख्रिश्चन हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →