[[चित्|250 px|इवलेसे|मधुबनी चित्रशैलीचा एक नमुना]]
मधुबनी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ साली शेजारील दरभंगा जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा निर्माण करण्यात आला. मधुबनी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून मधुबनी येथे त्याचे मुख्यालय आहे. २०११ साली मधुबनी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४५ लाख होती. मधुबनी हा भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी एक असून ह्या जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे.
मधुबनी चित्रशैली ह्या जगप्रसिद्ध चित्रकलेचा उगम मधुबनी परिसरामध्येच झाला. आजच्या घडीला मधुबनी चित्रांची विक्री व निर्यात हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे. राष्ट्रीय महामार्ग २७ हा येथून धावणारा प्रमुख महामार्ग आहे. जयनगर हे भारत-नेपाळ सीमेजवळील एक नगर रेल्वेचे टर्मिनस आहे.
मधुबनी जिल्हा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.