भारतीय लष्कर

या विषयावर तज्ञ बना.

भारतीय लष्कर

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे. भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटला समृद्ध असा इतिहास आहे आणि प्रत्येक रेजिमेंटने अनेक युद्धात भाग घेऊन यथोचित सन्मान मिळवले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे, परकीय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत. भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जाते. भारतीय लष्कराने पाकिस्तान,चीन यासारख्या शेजारील देशांसोबत केलेल्या युद्धप्रमाणेच ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत यासारख्या अंतर्गत मोहिमाही आखल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचा भाग म्हणून अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहे. भारतीय पायदळात १३,२५,००० नियमित सैनिक व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →