भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)/ काँग्रेस (ओ) किंवा सिंडिकेट/जुनी काँग्रेस म्हणूनही ओळखले जाते.
हा भारतातील एक नवीन राजकीय पक्ष निर्माण झाला होता, जेव्हा इंदिरा गांधींच्या हकालपट्टीनंतर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले. १२ नोव्हेंबर १९६९ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शेवटी इंदिरा गांधींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्विजिशनिस्ट) ही प्रतिस्पर्धी संघटना स्थापन केल्याने पक्षाचे विभाजन झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये ७०५ सदस्यांपैकी ४४६ (६३%) सदस्य इंदिराजींच्या बाजूने गेले. के. कामराज आणि नंतर मोरारजी देसाई हे काँग्रेस (ओ) चे नेते होते.
काँग्रेस(संघटन)ने बिहारमध्ये भोला पासवान शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली, कर्नाटक मध्ये वीरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि गुजरातमध्ये हितेंद्र देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकारे चालवली.
आणीबाणीच्या काळात १९७५-७६ पर्यंत बाबूभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातवर राज्य करणाऱ्या जनता मोर्चाचा देखील हा एक भाग होता.
विभाजनाला काही प्रकारे डावे/उजवे विभाग म्हणून पाहिले जाऊ शकते. इंदिराजींना पक्षासाठी जनसमर्थन एकत्रित करण्यासाठी एक लोकप्रिय अजेंडा वापरायचा होता. प्रादेशिक पक्ष, अभिजात वर्ग अश्या ज्यांनी-ज्यांनी काँग्रेस(ओ)ची स्थापना केली, ते अधिक उजव्या विचारसरणीसाठी उभे राहिले आणि सोव्हिएत मदतीवर अविश्वास दाखवला.
१९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ) ने सुमारे १०% मते आणि १६ लोकसभेच्या जागा जिंकल्या.मार्च १९७७ मध्ये, पक्षाने आणीबाणीनंतरची निवडणूक जनता पक्षाच्या सोबत लढवली होती. जनता पक्षाच्या आघाडीने इंदिराजींच्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव केला. त्याच वर्षी, काँग्रेस (ओ) ने औपचारिकपणे भारतीय लोक दल, भारतीय जनसंघ, सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, स्वतंत्र पक्ष आणि इतरांसोबत विलीन होऊन जनता पक्षाची स्थापना केली. काँग्रेस (ओ) चे नेते मोरारजी देसाई यांनी १९७७ ते १९७९ या काळात भारताचे चौथे पंतप्रधान म्हणून काम केले; जे भारतातील पहिले बिगर काँग्रेस सरकार होते. पण हे सरकार ५ वर्षे चालवू शकले नाही आणि १९७९ मध्ये पडले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.