धावडशीकर ब्रह्मेंद्रस्वामी (१६४९-१७४५) हे छत्रपती पहिले शाहू आणि पेशवे यांचे गुरू होते. त्यांचे मूळचे नाव विष्णू होते. वऱ्हाडातील दुधेवाडी हे त्यांचे गाव. ते धर्मक्षेत्रांच्या आणि तीर्थक्षेत्रांच्या रक्षणाचे काम करीत. पुढे ते काशीला गेले, तेथे त्यांनी संन्यास पत्करला आणि ब्रह्मेंद्रस्वामी हे नाव धारण केले. तीर्थयात्रा करीत करीत ते कृष्णाकाठी आले. तेथे यवनांनी उच्छाद मांडला म्हणून कोकणात आले.
कोकणातील चिपळूणजवळ मुंबई गोवा मार्गावर लोटे गावी परशुरामाचे देवस्थान आहे, तेथे ते राहू लागले (१६९८). या ठिकाणी बाळाजी विश्वनाथांची व ब्रह्मेंदस्वामींची ओळख झाली. हळूहळू स्वामींचे भक्तमंडळ वाढत गेले त्यांनी परशुरामाच्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी भिक्षा मागणे सुरू केले (१७०७). याचवेळी शाहूंची सुटका झाली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथाने शाहूचा पक्ष स्वीकारण्यात आणि पुढें त्यास पेशवाई मिळवून देण्यात स्वामींची अंंतस्थ खटपट असावी असे म्हणले जाते.
परशुरामपंत प्रतिनिधी, कान्होजी आंग्रे, फलटणकर निंबाळकर, नागपूरकर भोसले, अक्कलकोटकर भोसले वगैरे महाराष्ट्रांतील सर्व प्रमुख मंडळींवर व खुद्द शाहू छत्रपतींवर स्वामींची छाप होती.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव धावडशी होत.
ब्रह्मेंद्रस्वामी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.