बदलापूर

या विषयातील रहस्ये उलगडा.

बदलापूर

बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असून, दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, वालवली, वडावाली, कात्रप,खरवई अशा अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.तसेच बदलापुरात अनेक वृत्तपत्रे हवं आहे, त्यात प्रसिद्ध म्हणून सा.शिव दरबार,बदलापूर नामा, आदर्श बदलापुर,उल्हास विकास,विधान परिवार,विधान मित्र,असे वृत्तपत्रे आहे,शहरातील भ्रष्टाचार उघड करण्यास व त्यांना वाचा फोडण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →