पुणेरी पगडी हा एक महाराष्ट्रातील पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम पेशवाईच्या काळात झाला. महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत असत. त्याकाळी आणि आजही पुण्यात पगडी हे मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरिता लोकांनी तिला भोगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुणेरी पगडी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.