माधव गाडगीळ यांनी लिहिलेले “निसर्गाने दिला आनंदकंद” हे पुस्तक, दैनिक सकाळ या मराठी वृत्तपत्रात लिहिलेल्या ८८ लेखांचा संग्रह आहे. ह्या लेखांत जीवसृष्टी, उत्क्रांती, परिसराचा इतिहास, मानव व निसर्ग यांचे परस्पर संबंध, नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन, विकास आणि पर्यावरण यांच्यातील तथाकथित द्वंद्व असे नानाविध विषय हाताळले आहेत. लेखांमध्ये वारंवार मराठी कवितांतील अवतरणे वापरली आहेत. 'निसर्गाने दिला आनंदकंद' हे कवी वसंत बापट यांच्या 'निसर्गाने दिला आनंद, केवळ सौंदर्य, केवळ आनंद' या कवितेतील अवतरण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निसर्गाने दिला आनंदकंद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?