निद्रानाश

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

निद्रानाश ही मनुष्यास होणारी एक व्याधी आहे. यात झोपेचे प्रमाण अत्यल्प किंवा जवळ-जवळ नसते. हा एक मनाशी संबंधित आजार आहे. हा सहसा लवकर लक्षात येत नाही व त्याने गंभीर रूप धारण केल्याशिवाय जाणवत नाही.

मनुष्यास आधुनिक जीवनशैलीमुळे हा रोग जडतो. मानवाला जीवन जगण्यास आवश्यक अशा अन्न, पाणी तसेच शुद्ध हवा याचेबरोबरच झोपही तितकीच आवश्यक असते. झोप व मेंदू याचा अतिशय निकटचा संबंध असतो. त्यामुळे मेंदूचे कार्य बिघडले अथवा त्यावर अनावश्यक ताण आल्यास झोपेचे चक्रही बिघडते.निसर्गाच्या घड्याळाप्रमाणे असलेल्या जीवनशैलीशी फारकत हे याचे प्रमुख कारण आहे.

झोपेचे चक्र चार स्तरांचे असते. त्यातील पहाटेची साखरझोप फारच महत्त्वाची असते. यादरम्यान मेंदू हा मेंदूतील पेशी मजबूत करण्याचे व त्याच्या दुरुस्तीचे कार्य करतो. हे झोपेचे चक्र व्यवस्थित राहिले असता, व्यक्ती शांत राहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →