वराह मिहिर (जन्म : उज्जैनजवळचे कपित्थ (कायथा) नामक गांव, इ.स. ४९९; मृत्यू इ.स. ५८७) हे एक प्राचीन ऋषी होते. ते इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकातले भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. ते चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. वराज मिहिरांनी पहिल्यांदा दाखवले की अयनांशाचे मोजमाप ५०.३२ सेकंद इतके आहे.
वराह मिहिरांचे वडील आदित्यदास सूर्य भगवानचे भक्त होते. त्यांनी मिहिरना ज्योतिष विद्या शिकवली. पाटण्याजवळच्या कुसुमपुर येथे गेल्यावरतरुण मिहिर महान खगोलज्ञ और गणितज्ञ आर्यभट्टांना भेटले. त्यांच्या ओळखीतीन वराह मिहिर यांना इतकी प्रेरणा मिळाली की त्यांनी ज्योतिष विद्या और खगोल ज्ञान हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले.त्यावेळी उज्जैन विद्येचे केंद्र होते. गुप्त वंशाच्या राजवटीत तेथे कला, विज्ञान आणि संस्कृतीची अनेक उपकेंद्रे होती. वराह मिहिर उज्जैनला रहायला आले. येथे अनेक शहरा-गावांतून विद्वान एकत्र येत असत. काही काळाने सम्राट विक्रमादित्यांला(दुसऱ्या चंद्रगुप्तांला) वराह मिहिरांसंबंधी समजले आणि त्याने मिहिरांना आपल्या दरबारातील नवरत्नांमध्ये सामील करून घेतले.
वराह मिहिर यांनी ग्रीससारख्या दूरदूरच्या देशांतून प्रवास केला, व अखंड ज्ञानाची उपासना केली.
मिहिरांनी अनेक विषयांवर संशोधन करून लिहिले आहे. त्यांच्या विहिरीबद्दल व पाण्याच्या स्रोतांबद्दल जे लिहिले आहे त्यांतील हा काही भाग :-
दुसरा वराहमिहिर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!