झारखंड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

झारखंड

झारखंड (संताली: ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ) हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे. रांची हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची राजधानी आहे. झारखंड या राज्याचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या ३,२९,६६,२३८ एवढी आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →