कासगंज (जुने नाव: कांशीरामनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. एटा जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २००८ साली मुख्यमंत्री मायावतीने केली व त्याला बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ नेते कांशीराम ह्यांचे नाव दिले. २०१२ साली जिल्ह्याचे नाव कांशीरामनगर वरून बदलून कासगंज असे ठेवले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कासगंज जिल्हा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.