तिसऱ्या शतकात कुषाण साम्राज्याच्या अस्तानंतर काबूल दरी व गांधार या प्रदेशांवर नवव्या शतकापर्यंत बौद्धधर्मीय राजवंशांचे राज्य होते. पुढे इ.स. ८७० च्या सुमारास या प्रदेशावर हिंदू राजघराण्यांची सत्ता आली. या सर्व राज्यांना एकत्रितपणे काबूल शाही राजघराणी असे संबाधले जाते. पुढे अकराव्या शतकाच्या सुरुवातीस गझनीच्या महमूदाने या राज्यांचा पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काबुल शाही
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?