कागल हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील गाव आहे.ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल आनंद यादव यांचे जन्मगाव आहे.तसेच बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर हे येथे वास्तव्यास होते.कागल हे अलिकडे राजकारणाचे विद्यापीठ आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये या तालुक्यातील बऱ्याच नेत्यांचा समावेश होतो.तसेच कागलच्या गैबी पीरसाहेब दर्ग्याचा उरूस खूप मोठा असतो
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कागल
यामागील विज्ञान आणि इतिहास.