कमलेश्वर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कमलेश्वर

कमलेश्वर प्रसाद सक्सेना (६ जानेवारी १९३२ - २७ जानेवारी २००७), जे कमलेश्वर या नावाने ओळखले जातात ते २०व्या शतकातील भारतीय लेखक होते ज्यांनी प्रामुख्याने हिंदी भाषेमध्ये लेखन केले. त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगासाठी पटकथा लेखक म्हणूनही काम केले. आंधी (१९७५) मौसम (१९७५), छोटी सी बात (१९७६) आणि रंग बिरंगी (१९८३) हे चित्रपट त्यांच्या प्रसिद्ध कामांपैकी आहेत. त्यांना त्यांच्या हिंदी कादंबरीकितने पाकिस्तानसाठी २००३ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ते मोहन राकेश, निर्मल वर्मा, राजेंद्र यादव आणि भीष्म साहनी यांसारख्या हिंदी लेखकांच्या गटाचा एक भाग मानला जातात, ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील जुने साहित्यिक व्यवस्‍था सोडली आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील नवीन संवेदनशीलता सादर केल्या व १९५० च्या दशकात हिंदी साहित्याची नई कहानी ("नवी कहानी") चळवळ सुरू केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →