कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.
भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.
वनस्पती सेंद्रिय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्ठेतून सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात. जेव्हा मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात तेव्हा त्यांच्या विष्ठेत सेंद्रिय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंड्या जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करून आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात, तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रिय पदार्थ माणसाला ओळखता येतात, पण ते पूर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.
कंपोस्ट खत
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.