ऊर्मिला पवार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ऊर्मिला पवार

ऊर्मिला पवार ( ७ मे १९४५) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मूळ गाव तळकोकणात आहे. पवार यांचे वडील शिक्षक होते. पण लहानपणीच ते वारल्यामुळे आईला आयदान करीत चरितार्थ चालवावा लागला. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला. दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद, अशा प्रकारचे लेखनही ऊर्मिला पवार करतात.

एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →