अहिराणी साहित्य संमेलन

या विषयावर तज्ञ बना.

अहिराणी साहित्य संमेलन हे खानदेशात होणारे साहित्य संमेलन आहे. प्रा. चव्हाण आणि डॉ. शकुंतला चव्हाण यांनी प्रथमच अहिराणी साहित्य संमेलनाची संकल्पना खानदेशात रुजवली व वाढविली. त्यांच्या योजनेनुसार या पूर्वीची पहिली तीन संमेलने अनुक्रमे कासारे, मांडळ आणि चाळीसगाव येथे झाली होती. तर, चौथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नाशिकला तीन आणि चार डिसेंबर २०११ या दिवशी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ . शकुंतला चव्हाण होत्या. संमेलनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माणिकराव गावित, सुरूपसिंह नाईक, एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावित अशी राजकारणी मंडळी आली होती. या संमेलनाचे आयोजन खानदेश मराठा मंडळ, नाशिक परिसर यांनी केले होते.

या चौथ्या संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथयात्रा व सांस्कृतिक दिंडी झाल्यावर संमेलनाचे उद्‌घाटन अ‍ॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष , उद्‌घाटक , प्रमुख पाहुणे व संमेलनाध्यक्ष यांच्या भाषणानंतर दुपारी 'अहिराणी बोली व साहित्य मीमांसा' या विषयावर परिसंवाद झाला. सायंकाळी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री ‘खानदेशी ठेचा‘ हा विविधकलागुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन संमेलनाचा पहिला दिवस संपला.

संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ. यू.म.पठाण यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी डॉ.मु.ब. शहा हे प्रमुख पाहुणे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →