२०२४ वायनाड भूस्खलन हे ३० जुलै, २०२४ च्या पहाटे भारताच्या केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यामधील पुंजिरीमट्टोम, मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला, मेप्पडी आणि कुन्होम गावांमध्ये झालेल्या अनेक भूस्खलन घटना होत्या. मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळण्यास सुरुवात झाली, परिणामी चिखल, पाणी आणि दरडी या भागावर कोसळल्या. हे भूस्खलन केरळच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे, ज्यामध्ये किमान ४४३ मृत्यू, ३७८ हून अधिक जखमी आणि १३८ बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना २१व्या शतकात भारतात घडलेल्या अनेक हवामानसंबंधी सगळ्यात गंभीर घटनांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४ वायनाड भूस्खलन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.