२००६ महिला आशिया चषक हा तिसरा आशियाई क्रिकेट परिषद महिला आशिया चषक होता. महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ सहभागी झाले होते. भारतात १३ ते २१ डिसेंबर २००६ दरम्यान आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेतील सर्व सामने जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव करून ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००६ महिला आशिया चषक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.