प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो (एम.ए. पीएच.डी) या एक मराठी लेखिका आहेत. त्या वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मराठीच्या अध्यापिका आहेत. तेथल्या विद्यार्थ्यांना त्या मुंबई विद्यापीठातया पीएचडीसाठीचे मार्गदर्शन करतात.
कार्व्हालो यांनी काव्याबरोबरच कथा, ललित, बालवाङ्मय, संकलन, लोकसाहित्य असे अनेक प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे. उन्मेश, अंतर्यामी, सूर्य किरणात आला, पंख, माणूस उकरून काढावा लागतोय ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय त्यां प्रेमांजली’ व मृद्वेणा ही अनुवादित पुस्तके लिहिली आहेत.
कार्व्हालो यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान असे २५ पेक्षा अधिक पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत.
कार्व्हालो यांनी उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळावर व बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर संपादक म्हणून काम केले आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २४ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या अमृताते पैजा जिंके या मराठी भाषेचे वैभव सांगणाऱ्या ग्रंथात डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान हा लेख समाविष्ट आहे.
कार्व्हालो या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
इटली, जर्मनी, चीन असा देश-विदेशात त्यांचा प्रवास झाला आहे.
सिसिलिया कार्व्हालो
यामागील विज्ञान आणि इतिहास.