श्रीनाथ कलबाग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२८ रोजी दसऱ्याच्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे पॉप्युलर फार्मसी नावाचे मुंबईत दुकान होते. श्रीनाथ यांचा शाळेत असल्यापासूनच विज्ञानाकडे त्यांचा कल होता. घरी ते विविध प्रयेाग करत. उदा. साबण तयार करणे, रसायने वापरून कपडे ब्लीचिंग करणे, कागदावर छपाई इत्यादी.

त्यांनी शालेय शिक्षण मुंबईतील रॉबर्ट मनी शाळेतून झाले. तर बी.एस्‌सी. ही पदवी मुंबईच्या रॉयल इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथून मिळवली आणि एम.एस्‌सी.(टेक.) ही पदवी मुंबईतल्याच UDCT (University Institute of Chemical Technology)मधून १९५२मध्ये मिळवली. १९५३ साली अमेरिकेतील शिकागो येथील (Ilinois University)मध्ये त्यांनी खाद्य तंत्रज्ञानातील (Food Technology)मधील Ph.D. (विद्यावाचस्पती) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. प्रा.कुमाराओ यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अमेरिकेतील २ वर्षाच्या वास्तव्यात डॉ. कलबाग जवळपासच्या ग्रामीण भागांत फिरत होते व तेथील लोकांचे विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनाचे निरीक्षण करत होते. त्यांच्या लक्षात आले की तेथील शेतकरी केवळ शेतीतच नव्हे तर रोजच्या जीवनात पण विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यांच्या या निरीक्षणातच भविष्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रमाच्या स्थापनेची मुळे दडलेली आहेत.

महाविद्यालयामध्ये असतांना त्यांनी पारले कंपनीच्या कामगारांना त्यांचे अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी साक्षरता वर्ग चालवले.

डॉक्टरचा दर्जा मिळवल्यावर त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना अमेरिकेतील एका नामवंत कंपनीत संशोधक पदावर काम करण्याचे सुचवले. परंतु श्रीनाथ कलबागांनी भारतात परतण्याचा निश्चय केला. भारतात आल्यावर १९५५ साली ते Central Food Technological Research Institute (CFTRI) या म्हैसूर येथील संस्थेत सहाय्यक वैज्ञानिक संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी १९६३पर्यत काम केले. त्यानंतर ते हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड या कंपनीच्या संशोधक विभागात अभियांत्रिकी शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करू लागले. त्यावेळी मुलाखतीच्या वेळीच त्यांनी आपण वयाची २६ वर्षे शिक्षणासाठी म्हणजे ब्रम्हचारी आश्रमासाठी दिली. तशी पुढील २६ वर्ष गॄहस्थाश्रमात घालवणार व त्यानंतरची वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे ग्रामीण भागात जाऊन काम करण्यात व्यतीत करणार असे सांगितले होते. त्या निश्चयाप्रमाणे १९८२ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवॄत्ती घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →