शांता दत्तात्रेय जोग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शांता दत्तात्रेय जोग (२ जुलै, १९२५ - ५ एप्रिल, १९८०) या मराठीतल्या एक नाट्य‍-चित्रपटअभिनेत्या होत्या. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.

महाराष्ट्रात १९८०सालच्या आसपासच्या काळात पेट्रोल-डीझेलची अभूतपूर्व कमतरता होती. त्यामुळे लहान गावात नाटक कंपनीची गाडी, तिथे जाताना इंधनाची दोन-तीन पिपे भरून बरोबर घेत असते. त्याच गाडीत नाटकाची ड्रेपरी, नटांचे कपडेलत्ते व इतर सामान, नाटकात भूमिका करणारे कलावंत आणि अन्य सेवकवर्ग बसबरोबर या गावाहून त्या गावाला जात असे. अशाच एका बसमधून जाताना मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागून त्यात शांता जोग, जयराम हर्डीकर आणि इतर कलावंतांचा शेवट झाला.

शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →