वि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत.
वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली.
विठ्ठल दत्तात्रेय घाटे
या विषयावर तज्ञ बना.