विजयगड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

विजयगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपासून ६० किमी अंतरावर असलेला हा किल्ला जयगड किल्ल्याच्या उत्तरेस शास्त्री नदीच्या खाडीच्या उत्तरेकडील तिरावर तवसाळ या गावामध्ये आहे.

जयगड किल्याचा जोड किल्ला असणारा हा तवसाळ गावचा हा विजयगड किल्ला इतिहासा मध्ये कोठेही या गडाचे वर्णन नाही त्याच अस्तित्व मिटण्याच्या अवस्थेत आहे. या किल्ल्यावर काय घडलं हे आजवर कोणाला ही माहीत नाही. एका रहस्यच आहे.

या किल्ल्याचे बांधकाम करत असता ते वारंवार ढासलत होते. म्हणून तेथील बांधकाम धारकांनी ते चिरे तपासून बघता त्यांना तिथे श्री गणेशाचे आकाराचे चिरे मिळाले ते त्यांनी त्या महादरवाजात वापरले व या गडाची उभारणी केली.

|| श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती || या गडावर मोठया उत्साहाने शिक्षक,पालक व विद्यार्थी आणि वरिष्ठ लोकांच्या निदर्शनात उत्तम प्रकारे साजरी केली जाते.

या किल्ल्याच्या समुद्राच्या बाजूस म्हणजे त्याचा मागचा बाजूस गेल्या नंतर खालच्या बाजूला काही ठिकाणी तोफांचा मारा झालेला दिसण्यात येईल. विजयगड किल्ल्यावरून जयगड किल्ला हा नजरेस येतो. हा किल्ला जास्त झाडे झुडुपाणी झाकलेला असल्यामुळे पाहणी करण्यास सांभाळून जावे लागते.कारण मागचा बाजून जाताना खालच्या बाजूस पडण्याची भीती आहे. समुद्रा पासून किल्ल्याची उंची किमान अंदाजे ६०-७० फूट इतकी असावी किंवा जास्त असावी.शक्यतो मागच्या बाजूस जाऊ नका..जायचच असेल तर सांभाळून जा नाही तर गावामधील व्यक्तीना माहिती आहे त्यांना घेऊन जा ते योग्य ते मार्गदर्शन करतील.किल्ल्याची निगा नाही म्हणून तो झाडेझुडूपणी हेरला आहे त्याचा भिंती कोसळण्याच्या मार्गास आहे अद्यावत त्याच उत्खनन झालं होत परंतु कोरोना काळात ते थांबवलं गेल आता हा विजयगड किल्ला संपण्याच्या मार्गावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →