भारतीय संविधानाची उद्देशिका

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भारतीय संविधानाची उद्देशिका

उद्देशिका



आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य ;

दर्जाची व संधीची समानता;‍

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा

व राष्ट्राची एकता व एकात्मता

यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →