भदोही जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक लहान जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात स्थित असून ज्ञानपूर हे भदोही जिल्ह्याचे मुख्यालय आहे. १९९४ साली वाराणसी जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा निर्माण करण्यात आला. मायावतीच्या राजवटीदरम्यान ह्या जिल्ह्याचे नाव बदलून संत रविदास नगर जिल्हा असे ठेवण्यात आले होते.
गंगा नदी भदोही जिल्ह्याच्या नैऋत्येकडून वाहते. २०११ साली भदोही जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १६ लाख होती. हिंदी सोबत भोजपुरी व अवधी ह्या भाषा देखील येथे प्रचलित आहेत.
भदोही जिल्हा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.