पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्ने म्हणतात. त्यांतल्या ९ मौल्यवान रत्नांना भारतीय ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्नांचा उल्लेख नवरत्ने असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणाऱ्या तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्न वापरण्याचा सल्ला देतात. चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांनाच ज्योतिषी नवग्रह मानतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नवरत्ने
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?