जाती संस्था निर्मूलनाच्या चळवळी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

१९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी 'जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हे ऐतिहासिक भाषण तयार केले, मात्र या मंडळाने ते वादग्रस्त ठरवल्यामुळे प्रत्यक्षात होऊ शकले नाही. पुढे त्यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित केले. महर्षी धोंडो केशव कर्वे इ.स. १९४८ मध्ये जाती निर्मूलन संघाची स्थापना केली होती.

"जातिभेद, जातिद्वेषनी जातिमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे; जातिभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे."- लोकमान्य टिळक (बेळगावचे व्याख्यान, १९०७)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →