टंचाईमुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी राज्यात एकात्मिक पद्धतीने जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. शासनाने 5 डिसेंबर 2014 रोजी स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे या अभियानाची घोषणा केली. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचेही शासनाने वेळोवेळी जाहीर केले आहे
जलयुक्त शिवार' अभियानाचे काही प्रमुख उद्देश...
1)पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे
भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे
2)राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे
3)भूजल अधिनियमाची अंमलबजावणी
विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे
4)पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे
5)अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे
6)जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे
7)पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.
-Nitesh sir
जलयुक्त शिवार अभियान
यामागील विज्ञान आणि इतिहास.