पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजऱ्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजऱ्या होतात. उदा० छत्रपती शिवाजी महाराज जयंती
जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे जयंत्या साजऱ्या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजऱ्या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.
जयंत्यांची यादी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.