चंदगड हा महाराष्ट्रातील एक नावाजलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) आहे. ह्या तालुक्यात अतिपावसाळी डोंगराळ प्रदेश व तालुक्याच्या पश्चिमेला विस्तृत वनक्षेत्र आहे. कोकण-गोव्याशी संलग्न असलेल्या तिलारी आणि आंबोली अशा दोन घाटांवर हा तालुका वसला आहे. कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सर्वाधिक अंतर, दोन भिन्न भाषा-बोलींचा शेजार आणि नित्यसंपर्क, भाषावार प्रांतरचनेपर्यंत येथील विविध राजकीय अंमल अशा अनेक गोष्टींच्या पार्श्वभूमीवर येथील बोली स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये घेऊन तयार झालेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदगडी बोलीभाषा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.