गोपीनाथ कविराज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गोपीनाथ कविराज

गोपीनाथ कविराज (७ सप्टेंबर, १८८७ - १२ जून, १९७६) हे भारतीय संस्कृत विद्वान, भारतशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. १९१४ मध्ये प्रथम ग्रंथपाल म्हणून नियुक्त केले गेले, ते १९२३ ते १९३७ या काळात सरकारी संस्कृत महाविद्यालय, वाराणसीचे प्राचार्य होते. त्या काळात ते सरस्वती भावन ग्रंथमाला चे संपादकही होते.

तांत्रिक वांङमय में शक्तदृष्टी या त्यांच्या तंत्रावरील संशोधन ग्रंथासाठी १९६४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी त्यांना भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७१ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप बहाल करण्यात आली, जो साहित्य अकादमीने दिला जाणारा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →