काजू हे एक फळझाड आहे. या फळाला 'विलायती मॅंगो' म्हणून सुद्धा संबोधले जाते.
हिज्जली बदाम (हिंदी), गेरू (कन्नड), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तऱ्हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी खूप प्रसिद्ध आहे.
अधिक काजूबिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थांतही काजूचा वापर केला जातो. काजू हा आवडीने खाला जाणारा पदार्थ आहे .
काजू
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.