कडोली साहित्य संघ ही संस्था दरवर्षी कडोली साहित्य संमेलन बेळगाव जिल्ह्यातील कडोली या तालुक्यात भरवते. १४-१५ जानेवारी, २०१२ रोजी झालेले अधिवेशन २७वे होते. संमेलनाध्यक्ष रामनाथ चव्हाण होते.
कोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकवर्गणीतून या मराठी साहित्य संमेलनाने रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे. महाराष्ट्र सरकार किंवा कर्नाटक सरकार हे दोघेही या संमेलनाला आर्थिक मदत करत नाहीत.
कडोली प्रमाणेच कर्नाटकातल्या उचगाव, येळ्ळूर, चामरा, बेळगल्ली, माचीगड, काडदगा, सांबरा, बेळकुंद्री आणि कुद्रेमुख अशा आणखी आठ-नऊ गावांमध्येही दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. या संमेलनांकरता बेळगाव, कारवार, विजापूर, हुबळी या भागांबरोबरच दक्षिण महाराष्ट्रातूनही लेखक-कवी येत असतात. माचीगडला २७-१२-२०१०ला झालेले संमेलन तिथले १३वे होते. संमेलनाध्यक्ष डॉ.रामचंद्र देखणे हे होते.
बेळगावजवळील कडोली, उचगाव, येलूर, माचीघर या परिसरात गेली सन १९८४पासून दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरत असते. दि. २४ डिसेंबर २००६ रोजी प्रथमच सांबरा गावी साहित्य संमेलन संपन्न झाले.
कडोली साहित्य संमेलन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.