उत्क्रांतिवाद :
सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.
हा सिद्धान्त चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी जुलै १ इ.स १८५८मध्ये मांडला.
चार्ल्स डार्विन याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज् बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन् द स्ट्रगल फॉर लाईफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना लेखक शास्त्रज्ञ निरंजन घाटे म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".
उत्क्रांतिवाद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?