अमावास्या(किंवा अमावस्या) ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्यादिवशी(रात्री) पृथ्वीवरून, चंद्र दिसत नाही, ती तिथी अमावस्या असते. (अमा-सह, वस-राहणे). 'सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या' (=सूर्य-चंद्रांच्या परम सान्निध्याला अमावस्या म्हणावे) असे गोभिल सांगतो. म्हणजेच चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो दिवसा आकाशात असतो पण सूर्याच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे. अमान्त पंचांग पाळणाऱ्या महाराष्ट्र-गुजरात-कर्नाटकांत अमावास्येच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेपासून पुढचा (चांद्र)महिना सुरू होतो.
अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील त्या प्रस्तुत सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हणले आहे. यावरून अत्रींनी सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले, असे वाटते.
अमावास्या
थोडक्यात पण महत्त्वाचे.