अमर दीप हा १९७९ चा बॉलीवूडचा प्रणय-नाट्यपट आहे जो आर. कृष्णमूर्ती आणि के. विजयन दिग्दर्शित आणि के. बालाजी निर्मित आहे. या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत आहेत आणि विनोद मेहरा आणि शबाना आझमी यांनी त्यांना साथ दिली आहे. या चित्रपटातील गीतांचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले आहे आणि संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपट धीपम (१९७७) चा रिमेक होता जो मल्याळम चित्रपट थीक्कनल (१९७६) चा रिमेक होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि एका मोठ्या टप्प्यानंतर खन्नाचे पुनरागमन झाले. १९८० मध्ये चित्रपटाला फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्काराचे नामांकन मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमर दीप (१९७९ चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.