अटाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे.
हे गाव कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात मोडतं, मुंबई-कसारा रेल्वेमार्गावर आंबिवली स्थानकाचे पश्चिम भाग हे अटाळी गावाचं क्षेत्र आहे.काळू नदी व उल्हास नदीच्या संगमावर हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे, बहुतांश कोळी जमातीचे हे गाव आहे, मासेमारी, भातशेती व ताडाच्या झाडापासून मिळणारी ताडी व ताडगोळे हे येथील प्रमुख उत्पन्न आहे.. भौगोलिकदृष्ट्या व धार्मिकदृष्ट्या हे गाव विशेष आहे कारण हे गाव पूर्वेकडे काळू नदी व भातसा नदीचे संगम व पश्चिमेकडे काळू नदी व उल्हास नदीचे संगम या दोन संगमाच्या मधोमध वसलेले आहे, म्हणुनच येथील काळू नदी व उल्हास नदी संगमाच्या जवळ निसर्गाच्या कुशीत गर्द ताडाच्या व अनेक मोठ्या वृक्षांच्या वनराईत फार सुंदर असे 'श्री दत्त देवस्थान,(मठ)' आहे,येथे परमशांतिचा अनुभव मिळतो तसेच येथे दत्त जयंती उत्सव फार मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.या गावात हनुमान व विष्णू देवाचं मंदिर आहे, श्री विष्णू देवाची काळ्या पाषाणातील मूर्ती बाजुच्याच काळू नदीच्या पात्रात सापडली आहे, नदी किनारी एक प्राचीन देवालय आहे.
अटाळी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.