अंजली हा १९९० सालचा भारतीय तमिळ चित्रपट आहे. हा मणी रत्नम दिग्दर्शित चित्रपट आहे ज्यात रघुवरन, रेवती, मास्टर तरुण, बेबी श्रुती विजयकुमार आणि बेबी शामली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पार्श्वभूमी संगीत आणि गाणी इलायराजा यांनी संगीतबद्ध केले होते. हा चित्रपट एका मरणोन्मुख मानसिकदृष्ट्या अपंग झालेल्या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांनी अनुभवलेल्या भावनिक आघाताविषयीची कथा आहे आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत डब करण्यात आला आणि याच नावाने प्रदर्शित झाला. चित्रपटाने तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले ज्यात सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट होता. १९९१ मध्ये ऑस्करमध्ये भारताची अधिकृत प्रवेश म्हणून निवड झाली होती, परंतु त्यांना नामांकन देण्यात आले नव्हते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंजली (चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?